कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला भारत सरकारचे पेटंट

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर (स्वायत्त) येथील प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अमोल ममलय्या यांच्या संशोधनास भारतीय पेटंट मंजूर झाले आहे. त्यांनी पाण्यातील अळ्या शोधणारे व पाणी तपासणी करणारे छोटे यंत्र विकसित केले आहे. पाण्यामध्ये विविध प्रकारच्या कीटकांच्या अळ्या असतात. त्यातील बऱ्याचशा कीटकांच्या अळ्या उपद्रवी व अपायकारक असून या यंत्राच्या मदतीने त्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. याच यंत्रासाठीच्या निर्मितीचे पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे.या छोट्या यंत्राच्या मदतीने कमी वेळेमध्ये पाण्याची गुणवत्ता व त्यातील अळ्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. या यंत्राची निर्मिती डॉ. अमोल ममलय्या यांच्या सह रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मवीर भाऊराव पाटील, जुनिअर महाविद्यालय, आसखेडा, नाशिक येथील शिक्षक श्री. राजेंद्र काकुळते, रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालय, दहिवडी येथील पदार्थविज्ञान विभागातील प्रा. डॉ. विजयालक्ष्मी ममलय्या व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. कु. अनिता ममलय्या यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *