महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मान्सूनचा प्रवास वेगाने अंदमान बेटांकडे सुरू आहे. अवघ्या 24 तासांत तो दाखल होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी (heavy rain) सुरू आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचेही हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी (heavy rain) सुरू आहे. आसाम, मेघालय व पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट सुरूच असून तेथे 45 ते 49 अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विदर्भात तापमान 40 ते 44 अंशांवर गेले आहे.

या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *