राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर ट्वीट करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सरकारने आश्वासन दिले होते की 2021 मध्ये सर्वांना कोरोनाचे दोन्ही डोस दिले जातील, परंतु ते पूर्ण झाले नाही. ‘केंद्र सरकारने वचन दिले होते की, 2021 च्या अखेरीस नागरिकांना दोन्ही डोस पूर्ण केले जातील असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 1270 च्या घरात पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमिक्रॉनचे 1,270 रूग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 374 रूग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक 450 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीत 320, केरळमध्ये 109 आणि गुजरातमध्ये 97 रुग्ण आढळले आहेत.सुमारे 64 दिवसांनंतर कोरोनाच्या नवीन रुग्णांनी 16,000 चा टप्पा ओलांडला असून, भारतात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 3,48,38,804 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 91,361 वर पोहोचली आहे. एका दिवसात 220 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 4,81,080 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *