महावितरणचा मोर्चा आता घरगुती थकबाकीदारांकडे

शेतकऱ्यांकडील वीज बिलाच्या रकमेची थकबाकी मोठी आहे. मात्र, त्यासाठी कडक वसुली सूरू केल्यावर त्याचे वेगळे पडसाद उमटून राजकीय आंदोलने होत आहेत. त्यामुळे आता तीन महिने शेतकऱ्यांची वीज न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम वसुलीवर होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने आता आपला मोर्चा घरगुती ग्राहकांच्या थकबाकी वसुलीकडे वळविला आहे. बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असून नगर जिल्ह्यात अशा चार हजार ९८० थकबाकीदार ग्राहकांची वीज या महिन्यात तोडण्यात आली आहे.
महावितरणची केवळ कृषी पंपच नव्हे तर अन्य ग्राहकांकडेही मोठी थकबाकी आहे. त्यातील सरकारी आणि संस्थात्मक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी अडचणी येत आहेते.
योगी सरकारचा पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मोफत रेशन..
घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा अशा ग्राहकांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. नगर जिल्ह्यात २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे. त्यातील घरगुती वीज वापरणाऱ्या सुमारे २ लाख ३३ हजार ग्राहकांकडे २४ कोटी २७ लाख एवढी थकबाकी आहे. त्यासोबत पथदिवे ३५३ कोटी ८५ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ६५८ ग्राहकांकडे ६४ कोटी ६२ लाख अशी सरकारी आणि संस्थात्मक ग्राहकांकडेही थकबाकी आहे.
यासाठी वीज वितण कंपनीने आता कडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याच एक भाग म्हणून सुमारे पाच हजार घरगुती ग्राहकांची वीज तोडण्यात आली. ज्यांनी पैसे भरले, त्यांचा वीज पुरवठा लगेच सुरळीत करण्यात आला. ही मोहीम सुरूच राहणार असल्याने ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *