धर्माबद्दल असलेल्या भावनांचे प्रदर्शन नको : शरद पवार
“प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांची प्रदर्शन नको. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं. धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर होणारी टीका अशोभनीय आहे. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. पण, सत्ता येत जात असते”, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
“सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या लोकांकडून असले प्रकार होणारच”, असे म्हणत पवारांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला.