ब्रेकिंग – कोल्हापूर : नदी काठावरील गावांना दक्षतेचा इशारा
आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा १८ फूट पूर्ण उघडून अडकला. त्यामुळे नदी (river) पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी (river) काठावरील गावे, नदीवर जनावरे, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे.