तरुणानं प्रेयसीसोबत गाठला क्रूरतेचा कळस

(crime news) मुंबईतील (Mumbai) तुर्भे परिसरात हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. लग्नाची मागणी केल्याच्या कारणातून येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं रात्री उशिरा प्रेयसीचा गळा आवळून खून (Boyfriend killed girlfriend) केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाणाऱ्या आरोपी तरुणाला ताब्यात (Accused boyfriend arrested) घेतलं आहे. तसेच बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी संबंधित प्रेमीयुगुलानं मुंबईतील तुर्भे परिसरातील साई प्रणव लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. भांडणाचा आवाज बाहेर येत होता. त्यामुळे हॉटेलच्या स्टाफने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करत तरुणीला मृत घोषित केलं.

दरम्यान, मृत तरुणीसोबत असलेला तरुण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच गळा आवळून तिची हत्या केल्याचं आरोपी प्रियकरानं पोलिसांना सांगितलं. आरोपी तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहेत.(crime news)

आरोपी तरुण हा खडकपाडा कल्याण येथील रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपी मृत तरुणीसोबत प्रेमसंबंधात होता. काही दिवसांपासून मृत तरुणीनं लग्नासाठी तगादा लावला होता. पण आरोपीला लग्न करायचं नव्हतं. घटनेच्या दिवशी लॉजमध्ये देखील दोघांत याच कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रियकराने गळा आवळून प्रेयसीचा खून केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *