कोल्हापूरकरांना मिळाला मोठा दिलासा

कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासापासून स्थिर आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 40 फूट पाच इंचांवर स्थिर आहे. राधानगरी धरणाच्या (dam) पाच स्वयंचलित पैकी एक दरवाजा पहाटे चार सुमारास बंद झाला आहे.

एक स्वयंचलित दरवाजा बंद झाल्याने भोगावती नदीतील विसर्ग 1 हजार हुन अधिक क्यूसेकने कमी झाला आहे. पावसाचा विश्रांती, पंचगंगा नदीची स्थिर पाणी पातळी, आणि राधानगरी धरणाचा (dam) स्वयंचलित दरवाजा बंद झाल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. बुधवारी पहाटे पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर दिवसभरात ५ दरवाजे उघडले होते. त्यातील एक दरवाजा आज सकाळी बंद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *